ताज्या घडामोडी

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा ( CAA) पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने तर्फे निषेध

इचलकरंजी : मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जाणीवपूर्वक मतांचे राजकारण करत धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठीच CAA हा कायदा लागू केला आह या निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने तर्फे इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालया समोर जाहीर निषेध करण्यात आला.

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तौफिक किल्लेदार कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे यांनी प्रातांधिकारी कार्यालयातील शिरेस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले

भारतीय संविधानाने नागरिकत्वाची जी आचारसंहिता लागू केली आहे या मध्ये व्यक्तीसाठी आहे ती कोणत्याही जातीला किंवा धर्माला नाही. मग भाजपा चे हे सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीय वगळून बाकी सर्व धर्मियांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणं म्हणजे संविधानाला च लाथाडल्यासारखे आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे तोच उद्ध्वस्त करून मनुस्मुर्ती लादण्याचे षडयंत्र मोदी ,शहा आणि भाजपा सरकार करत आहे. हिंदुराष्ट्र च्या नावाखाली या देशातील मुस्लिम धर्मीय वगळून अल्पसंख्याक समाजातील भावा बहिणीना अन्यायकारी या कायद्याचा आम्ही निषेध करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे ही विरोध करून हा अन्यायी संविधान विरोधी कायदा मागे घ्यावा असे आवाहन करत आहोत.

जर का जबरदस्तीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे . निवेदना वर कुमार कांबळे ( रेंदाळ ) राजू पेंढारी (रुकडी ) सलिम सनदी आदिच्या सहया आहेत

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.