ताज्या घडामोडी

शालेय प्राथमिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा काही भाग असल्याचा पवारांचा आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर .

नासिक प्रतिनिधी

नाशिक– शालेय प्राथमिक अभ्यासक्रमाच्या आराखड्यात मनुस्मृतीचा उल्लेख असल्याच्या चर्चेने राजकीय वादंक निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार यांना आज पत्रकार परिषदे दरम्यान याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली .शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या संबंधी राज्य सरकारकडे भूमिका मांडली पाहिजे, असं मत व्यक्त केल, तर दुसरीकडे भाजप नेते आणि राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या उल्लेखासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ही बाब माझ्याही वाचनात आली आहे .ज्या दोन-तीन गोष्टी आहेत त्यामध्ये मनुस्मृतिचा उल्लेख आहे. या गोष्टीबाबत शैक्षणिक क्षेत्रातील जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा आणि या संबंधीची आग्रही भूमिका सरकार समोर मांडावी , मात्र त्यांनी जर ही भूमिका घेतली नाही, तर प्राकृतिक विचारांच्या अनेक संस्था आहेत , त्या गप्प बसणार नाहीत असा अप्रत्यक्ष इशारा पवार यांनी दिला आहे. मनुस्मृतीबाबत होत असलेल्या आरोपाचा देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक शब्दात प्रत्युत्तर देत, अलीकडच्या काळात आरोप करणाऱ्यांना काही उद्योग ऊरले नाहीत, वाटेल ते आरोप केले जात आहेत, महाराष्ट्रात वर्षानुवर्ष मनाचे श्लोक बोलले जातात, एकले जातात ,मात्र त्या गोष्टी अभ्यासक्रमात आहेत की नाही हे मी तपासले नाही .परंतु विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो योग्य नाही. असं फडणवीस म्हणाले. दरम्यान या मुद्द्यावरून आगामी काळातील राजकीय नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नसून याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात हे मात्र महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.