लासलगाव महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव, ता. २३ : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.रावसाहेब खुळे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर, श्री.मोहन बागल, श्री.रामसिंग वळवी, श्री.महेश होळकर, श्री.रामनाथ कदम, श्री.महेश होळकर, श्री.रामनाथ कदम, श्री.दत्तात्रय गायकवाड, श्री.शरद सोनवणे इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात श्री.उज्वल शेलार म्हणाले की आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यात अनेक क्रांतिकारक, देशभक्तांचा फार मोठा वाटा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यातलेच एक मोठे नाव. मनापासून देशावर प्रेम करणे, देशाचा मान तोच माझा मान असे नेताजी मानत. नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी नेताजींनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला “जय हिंद” हा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा” असे आव्हान त्यांनी भारतासाठी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी केले.
आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि रा.से.यो. स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.