क्षितिज सामाजिक संस्था हेरले व मैत्री ग्रुप रूकडी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती,सावित्री बाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्षितिज सामाजिक संस्था हेरले मैत्री ग्रूप रुकडी यांच्या
सहकार्याने रूकडी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून एकल महिलांची सभा घेण्यात आली क्षितिज संस्थाध्यक्ष व माझी सभापती जयश्री कुरणे यांनी एकल महिलांचे प्रश्न घेऊन येथील महिलांशी संपर्क साधला त्या म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम एकल महिला या मुद्द्यावर काम करण्यास सुरुवात केली त्यांच्या जीवन कार्यात सहभाग घेऊन एकल महिलांचा प्रश्न घेऊन आपण हे काम सुरू केले आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून त्यांचे हे काम पुढे चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे एकल महिलांच्या प्रश्नांवर बोलताना त्यापुढे म्हणाल्या की क्षितिज संस्थेच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील विविध गावात एकल महिला संघटनेचे स्थापना होत आहे याचा उद्देश एकल महिलांनी एकत्रित येऊन आपले प्रश्न शासन दरबारी अग्रक्रमाने पुढे घ्यावेत व महिला धोरणांमध्ये आपले प्रश्न अग्रक्रमाने पुढे न्यावेत यासाठी या संघटनेचे स्थापना करीत आहोत याप्रसंगी एकल महिला संघटना तसेच मैत्री ग्रूप नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे त्यातीलच एक म्हणजे विधवा प्रथा बंदी , विधवेला देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत एका महिलेचे पती मयत झाले त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित राहून त्या महिलेला. पतीच्या मातीच्या कार्यक्रमावेळी तिला हिरवी साडी हिरव्या बांगड्या व सौभाग्याची ओळख असणाऱ्या वस्तू देवून ओटी भरली जाते अशीच एक ओटी भरणी कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी एकल महिला संघटना रूकडी यांची स्थापना झाल्याचे घोषणा करण्यात आली उपस्थितांमध्ये क्षितिज संस्थेच्या कार्यकर्त्या रोहिणी कांबळे विशाखा प्रधान अक्काताई कांबळे लता कोल्हे सुमन चौगुले या उपस्थित होत्या तसेच मैत्री ग्रुप रुकडी येथील भारती गायकवाड ग्रुप ॲडमिन ,दुर्गा कांबळे, प्रभावती गायकवाड पद्मा गायकवाड सीमा गायकवाड गीता शिंदे शोभा शिंगे या महिला उपस्थित होते आभार भारतीय गायकवाड ग्रुप ॲडमिन यांनी मांनले .