ताज्या घडामोडी

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ महाराष्ट्र

संपादक सोमनाथ मानकर 

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ जयाजी नाथ साहेब यांचे मार्गदर्शन घेत समाजातील आर्थिक व दुर्बल शैक्षणिक घटकांची सुधारणा होण्यासाठी स्वतंत्र नाथपंथीय विकास महामंडळ स्थापना व्हावी यासाठी काल मुंबई येथे माजी राज्यमंत्री आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात समाजाच्या व्यथा त्यांचे समक्ष मांडल्या तसेच इतर सर्व समाजाचे स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन झालेले आहेत आमचे समाजासाठी शासकीय योजनांचा लाभ कोता होतो तरी नाथपंथीय समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना व्हावी या उद्देशाने काल प्रहार संघटणेचे संस्थापक आदरणीय श्री बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेऊन घेण्यात आली व मा. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्याची चर्चा करणार आहे असे सांगण्यात आले तसेच लवकरात लवकर आपण याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले याप्रसंगी उत्तम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके, पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड साहेब, प्रहार नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी, प्रहार जिल्हा चिटणीस समाधान बागल, प्रहार युवा जिल्हाध्यक्ष जगन भाऊ काकडे, विजय कापडणीस व समाजातील इतर सदस्य उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.