ताज्या घडामोडी

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग रिपी नरसिंहराव आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा.

सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर – केंद्र सरकारने शुक्रवारी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग पीव्ही नरसिंहराव आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी x वर पोस्ट करून दिली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री करपोरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर केला होता. देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान समर्पित आहे असे पीएम मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे हे सांगताना आनंद होत आहे एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंहराव यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत देश सेवा केली .देशातील कृषी आणि शेतकरी कल्याण साठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल एम एस स्वामीनाथन यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करत आहोत ही आनंदाची बाब आहे असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.