सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात: दहा जण ठार, 25 ते 30 जण जखमी, ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ते शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सिन्नर ते शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे. ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला असून, बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मृतात 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश नाशिक-शिर्डी महामार्गावर मुंबईहून शिर्डीकडे येणाऱ्या पर्यटक बसची समोरासमोर धडक झाली. यावेळी बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ जवळच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची
प्रकृती गंभीर आहे.पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही बस मुंबईतील अंबरनाथ येथून प्रवाशांना शिर्डीला दर्शनासाठी घेऊन जात होती. सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
———————————————————–
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त ;
अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले
———————————————————-