ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातून तीन अटल गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार
मुख्य संपादक राहुल वैराळ

जळगाव जिल्हयात टोळीने गुन्हे करणाऱ्या तिघांना गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. विशाल मुरलीधर धावाडे, उदय रमेश मोची,( बनवाल ), अभिषेक उर्फ बजरंग परशुराम जाधव, तिघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, अशी हातपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. जळगाव शहरात तिघांविरुद्ध एमआयडीसी आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. हद्दपार करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. तिघांपासून जनतेच्या जीवितासह मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला असल्याची चौकशीत निष्पन्न झाले आहे.